बुधवार, २१ जुलै, २०१०

प्रतिक्रिया

आज ई सकाळ वाचत होते. प्रत्येक बातमी खाली प्रतिक्रिया देण्याची सोय आहे. लोकशाही आहे ना प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली पाहिजे. पण लोकं काय वाट्टेल ती प्रतिक्रिया देत असतात. कधी कधी वाचून खूप चीड येते. बातमी वाचता वाचता स्क्रोल करत खाली जावं तर प्रतिक्रिया दिसतातच आणि कितीही नाही ठरवलं तरी पहिली प्रतिक्रिया वाचली जातेच.
मुक्तपीठ मधे तर काही प्रतिक्रिया दिलेल्या असतात. लोकं स्वतःचे अनुभव लिहितात, त्यावर तू मुर्खच आहेस एवढं कळत नाही का असे काही वेडपटासारखे लिहितात. म्हणजे अनुभव काय आहे त्याचा काही संबंध नसतो.
माझा ब्लॉग लिहियला सुरूवात केली आहे. आता असेच लोकं माझ्या ब्लॉग वर ही काहीतरी प्रतिक्रिया देतील. बघुयात काय होते ते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: