मंगळवार, २२ जून, २०१०

ब्लॉग ची सुरुवात

हा ब्लॉग आयडी बनवून जवळपास दोन वर्षे झाली. काय लिहावे ते आधी सुचतच नव्हते. मग विसरुन ही गेले की मी ब्लॉग लिहिणार होते. ३-४ महिन्यापूर्वी इंटरनेट सर्फ करता करता marathiblogs.net  ही साईट बघितली आणि छंदच जडला. दर २-३ तासांने कोणती नवीन एंट्री आहे ते बघायचे. मग परत स्वतः चा ब्लॉग सुरू करण्याची परत तयारी केली. मग आपण कशावर ब्लॉग लिहियचा हा विचार करण्यात अनेक दिवस गेले. कोणी कविता करतात, कोणी पाककृती देतात, कुणी खादाडिवर लिहितात. मग विचार केला एका कुठल्या ठराविक विषयावर लिहायला पाहिजे असे नाही. विचार करत बसण्यापेक्षा ते लिहिणे जास्ती महत्वाचे. तेव्हा जे काही मनात येईल ते लिहायचे, बस आपले विचार छापत राहयचे...